बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

स्वतंत्रता दिवस


आज ६5 वा  स्वात्यंत्र दिन आपण साजरा करतो  आहोत तरी मन खिन्न व उद्वेगाने जळतो आहे. एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उच्छाहाने साजरा होतो आहे   तर दुसरीकडे राजकीय प्रणालीचा  होत असलेला ऱ्हास भ्रष्टाचाराने बरबटलेला, राजकीय उदासीनता आणि अनेक समस्यानी घेरलेला देश दि
सतो आहे.   
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ६४ वर्षे झाली पण देशाची स्थिती जैसे  थे वैसे आहे. हो म्हणायला, आपण प्रगती पथावर आहोत पण आपली राजकीय परिस्थिती व नेते मंडळी  सर्व " मी, माझी माणस " अश्या  संकुचित बुद्धीने आपलाच देश गेल्या ६5 वर्षे  हळू हळु  पोखरत आणला आहे. एकालाही देशाची व जनतेचे भले करावे असे मुळी वाटतच नाही. त्या मुळे मोठ मोठे आर्थिक घोटाळे झाले. संसदेत कायदा करणारेच त्यास मोडीत काढीत आहेत.सरकारी यंत्रणेचा आपल्या मर्जी प्रमाणे उपयोग करून धन ,संपती गोळा करीत आहेत. आज पर्यंत या देशात बऱ्याच नेत्यांनी गैर मार्गाने संपती गोळा केली काहीची उघड झाली तर काहीची नाही. बरे ज्याच्यावर  आरोप पत्र दाखल झालेतरी अस्तित्वात असलेलेया कायद्या मधील चोर वाटा द्वारे व संसदेचे संरक्षण त्यामुळे एकाही मंत्र्यावर किवां संसद सद्श्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. हें आपले दुर्दैव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा